पोस्ट्स

कुंभार्ली घाटातली वाघबारस

इमेज
वाघबारसविषयी मी ऐकून होतो. तलासरी भागात असल्यामुळे इथल्या वाघबारसची कल्पना आहे परंतु कुंभार्ली घाटात होणारी वाघबारस पाहायची उत्सुकता लागली ती सदफची पोस्ट पाहिल्यावर. खरं तर हा मागच्या वर्षीचा(२०२३) अनुभव आहे. चिपळूण येथे राणी आणि सदफ यांच्या सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेत(SCRO) पोचलो. तिथून आम्ही कुंभार्ली घाटच्या दिशेला निघालो. घाटमाथ्यावर किसरुळे, भाटी, केमसी आणि कासारखडकपाडा असे चार धनगर समाजाचे पाडे. त्यातील कासारखडकपाडा येथे वाघबारस साजरी करण्याकरिता तिकडे गेलो. कासारखडक पाड्यात एकूण पाच कुटुंब. साधारण पंचवीसेक लोकसंख्या.  पाड्यातल्या एका मोकळ्या जागेत गावकरी, लहान मुलं आणि वाघबारस बघण्याकरिता मुंबई, पुणे येथून आलेले आम्ही सारे जमलो होतो. वाघबारसकरिता आलेल्या पाहुणे मंडळींनी पाड्यातील लहान मुलांना रंगवायचे होते. थोडक्यात काय तर त्यांनी वाघ, बिबट्या, कोळशिंदा, अस्वल कसे दिसतात या कल्पनेतून मुलांचे चेहरे रंगवायचे होते. सर्वांनी ते केले शिवाय आमच्यातले काही जण स्वतः रंगण्यासाठी इच्छुक झाले. मग तिथल्या मुलांनी आमच्या चेहऱ्यावर वाघ, कोळशिंदा असे चित्र रेखाटले. वाघबारस दिनी पाड्...

पुस्तक परिचय - सत्तर दिवस

इमेज
पुस्तक - सत्तर दिवस लेखक -  रवींद्र गुर्जर युरुग्वे दक्षिण अमेरिकेतील एक छोटासा देश. त्या देशातील तरुणांनी रग्बी खेळात दोनदा राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावले होते. यावेळीही ते अजिंक्यपद पटकवण्यासाठीच निघाले होते. दिनांक १२ ऑक्टोबर १९७२. एअरफोर्सच्या 'फेअर चाईल्ड एफ २२७' ह्या विमानानं पंचेचाळीस प्रवाशांसह आकाशात झेप घेतली. हिमालयसारख्या पर्वत रांगा या भागात आहे. विमान आकाशात झेपत असताना खराब हवामानमुळे त्यांचं विमान कोसळतं. आणि जगाशी संपर्क तुटतो. चहू बाजूने बर्फाच्छदित प्रदेश. यातून सुटका करण्याकरिता चिली, अर्जेंटीना सारखा नजीकचा देश सहकार्य करतो पण तो देखील अपयशी ठरतो. त्या बर्फाच्छदित प्रदेशात फसलेल्या पंचेचाळीस लोकांपैकी केवळ सोळा जणं जिवंत राहतात. त्या सोळा जणांनी अनुभवलेलं मरण या पुस्तकात कथित केलं आहे. मुबलक जेवण सोबत नाही तसेच संपर्क करण्याकरिता साधन नाही. जिवंत राहण्यासाठी काहीतरी खाणं आवश्यक होतं. म्हणून सोळा जणांनी नरमांस भक्षण करत सत्तर दिवस काढले. त्या सोळा जणांनी आपापसांत कामे वाटून तेथून बाहेर निघण्याचे प्रयत्न केले आणि त्यातून ते सुटले तब्बल सत्तर दिवसांनी. या सत्तर द...

कोहोज ट्रेक...

इमेज
सप्टेंबर महिन्यातला ट्रेक करिता ठरवलेला कोहोज किल्ला. यावेळी कोहोज किल्ल्याला जाण्याकरिता खूप उशीर झाला. नाणे गावमार्गे जाण्याचे नियोजन ठरले. स्थानिक दोन-तीन गावकरी आम्हाला दिले. पण त्यातले एकच जण आमच्या सोबतीला आला. प्रचंड पावसामुळे गवत आणि झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळे जाणारी वाट समजून येतं नव्हती. 'शककर्ते शिवराय' समूहाने दिशादर्शक बाण असलेले पोस्टर लावलेले पण त्यावरील बाण स्पष्ट दिसत नव्हते. पायथ्याला आम्ही पंधरा-वीस मिनिटे रस्ता भरकटलो होतो. मार्गदर्शकाला पण ठाऊक नव्हतं. अखेर त्याने एक वाट दाखवत आम्ही त्यामार्गे निघालो. आणि गडाच्या मूळ वाटेशी पोचलो. सरळ उंच अशा चढाईचा किल्ला. रस्त्यात मोठमोठे दगड. आणि त्या पावसामुळे दगडांवर आलेले शेवाळे त्यामुळे पायही सरकत होते. अर्ध्या टप्प्यात गेल्यावर सरळ उंच अशी दगडांची रांग होती. एकमेकांचा हात देत मदत करत वर चढलो. हा अनुभव खूप थरारक होता. दोन टेकड्या चढल्यावर गडाच्या अर्ध्या रस्त्यात पोचतो. महादेव मंदिर परिसरात पाण्याचे टाके आहेत तसेच मंदिराच्या शेजारी दोन तोफा आहेत. मंदिराच्या समोर काही जुने अवशेष एका झाडाखाली रचून ...

पाटणादेवी मंदिर...

इमेज
लहानपणी अनेकांनी महादेवाच्या मालिका पाहिल्या असतील. त्यात राग आल्यावर महादेवाने तांडव नृत्य केल्याचं देखील पाहिलं असेल. त्याची कथा अशी होती की, दक्षप्रजापती यांनी एक यज्ञ केला होता. त्या यज्ञास दक्षप्रजापतीची सती नामक पुत्री आणि त्या सतीचे पती महादेव यांना निमंत्रण नव्हते. तरीही सती त्या यज्ञास जाते. आणि तिथे तिचा अपमान होतो. झालेल्या अपमानाची चीड येऊन सती त्या यज्ञात स्वतःचा देह टाकून देते. महादेवाला असे समजताच त्यांना प्रचंड राग येतो. महादेव सतीच्या शवाला जवळ घेतात व दक्षप्रजापतीचे मुंडके छाटतात. आणि तांडव नृत्य करायला लागतात. ते करत असताना त्यांचे तिसरे नेत्र उघडले जाते. त्यावेळी भगवान विष्णू सुदर्शन चक्राचा वापर करून सतीचे तुकडे करतात. सतीचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ती ती ठिकाणं शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध झाली. अशा अनेक आख्यायिका आजही ऐकायला मिळतात. पाटणादेवी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली दीपमाळ... खान्देशातील चाळीसगावपासून अठरा किलोमीटर अंतरावर पाटणा हे गाव आहे. गावच्या नजीक गौताळा अभयारण्य आहे. त्यात चंडिकादेवीचं मंदिर(पाटणादेवी), हेमाडपंथी महादेव मंदिर, कन्हेर गड, पितळखोर...

पुस्तक परिचय - कथा अणुस्फोटांची

इमेज
पुस्तक - कथा अणुस्फोटांची लेखक - निरंजन घाटे ११ मे १९९८ आणि १३ मे १९९८ रोजी भारतानं एकूण पाच अणुचाचण्या केल्या. यामुळे बहुसंख्य भारतीयांना खूप आनंद झाला. त्यावेळी बऱ्याच वाचकांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून आपापली मतंही व्यक्त केली. बहुतेकांचा सूर भारतीय शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा होता. या काळातच पुस्तकाची छपाई सुरू होती. वेगवेगळ्या देशांनी अणुबॉम्ब तयार करताना काय केलं याची माहिती या लेखांमधून आढळते. याप्रमाणे शत्रूपक्षाला बॉम्ब मिळू नये म्हणून इस्त्राईलसारखे देश कसे धडपडतात त्याचीही माहिती या पुस्तकात आहे. चोरट्या मार्गानं अणुबॉम्ब मिळवण्याचे प्रयत्नही दिसतील. भारतानं निर्माण केलेली अण्वस्त्र अशी चोरून मारून केलेली नाहीत तर भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाचं ते फळ आहे. हे भारतीय अण्वस्त्रांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ज्यांना अण्वस्त्रनिर्मितीचा इतिहास आणि अण्वस्त्रधारी बनण्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्रांनी कोणकोणते प्रयत्न केले याची माहिती हवी असेल. तर त्याची झलक या पुस्तकात बघायला मिळेल. - शैलेश दिनकर पाटील

मित्राची कारागिरी...

इमेज
कंपनीच्या स्पोर्ट्स करिता रत्नागिरीत गेलो होतो. जेवण आटपून आम्ही मारुती चौकातल्या मारुती मंदिरात फेरफटका मारायला गेलो. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे शिवाय काही तोफ, तुतारी, ढोल वाजवतानाचे मावळे अशी शिल्प आहेत. ते ठिकाण आवडलं म्हणून फोटो काढून अपलोड केला. तर मित्र वैभवचा मॅसेज आला. 'जरा क्लिअर फोटो पाठव.' त्याला दोन-तीन फोटो पाठवले. ते पाहून त्याचा मॅसेज आला की, हे मी बनवलं आहे. मारुती चौकात असलेलं शिल्प  सुरवातीला वाटलं हा असा का बोलत आहे हे स्मारक बांधून तर बरीच वर्ष झाली. तितक्यात त्याने जुने फोटो पाठवले. ज्यावेळी स्मारकाचं काम सुरु होतं तेव्हाचे ते फोटो होते. तो म्हणाला की, आम्ही कॉलेजला असताना आम्हाला प्रोजेक्ट दिलेला. तेव्हा आम्ही हे बनवले होते. त्याचं काम पाहून खूप अभिमान वाटला. आणि उगाच माझी कॉलर ताईट झाली. जेवण झाल्यावर आमचा काही स्टाफ तिथे आला होता. त्यांना अभिमानाने सांगितलं की हे माझ्या मित्राने बनवलं आहे. खरं सांगू मला फार भारी वाटलं. वैभवची कलाकारी.. वैभव एक उभरता शिल्पकार आहे. आमचा परिचय विकासच्या माध्यमातून झाला. खरं तर वैभव बाराखडीच्या पोस्ट पहायच...

पुस्तक परिचय - माझी काटेमुंढरीची शाळा

इमेज
पुस्तक - माझी काटेमुंढरीची शाळा लेखक - गो. ना. मुनघाटे गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात असणारे काटेमुंढरी हे गाव. माडिया गोंड हा आदिवासी समाज याच परिसरातला. या गावात एका शिक्षकाची नियुक्ती होणे. आणि ते त्याच्या मनाविरुद्ध घडलं. म्हणून सरकारविषयी सूड मनात ठेवला आणि व्यसनाच्या आहारी गेला. आणि अशातच त्याची आत्महत्या/खून झाला. गावात शाळा आहे शिक्षक हवा म्हणून गोविंदराव मुनघाटे यांची नियुक्ती झाली. काटेमुंढरी जाताना 'बाबूजी काहेको मरने काटेमुंढरी जाते हो' असा सल्ला ट्रक ड्रायव्हरने दिला. पण तरीही आपली वाट धरून मुनघाटे गुरुजी गावात पोचले. गावचे मडगू पाटील यांनी केलेले स्वागत आणि त्यांनी दिलेली मोलाची साथ गुरुजींना खूप भावली. गावचा कायापालट करण्याकरिता गुरुजींना महत्वाची साथ लाभली ती गावचे मडगू पाटील, गावचा खबरी डाफ्या कोतवाल, विद्यार्थी शिदू यांची.. हे पुस्तक वाचताना खऱ्या अर्थाने सामाजिक भान जपणारी माणसं वाचायला मिळतात. त्यातील उत्तम उदाहरण म्हणजे नागोसे गुरुजी आणि मडगू पाटील... विद्यार्थ्यांसाठी जीव ओतून काम करणाऱ्या नागोसे गुरुजींना देखील कारागृहात जावे लागते अन् खोट्या आरोपांमुळ...